भुमिका

ओबीस जनक्रांती परिषद स्थापन्यामागिल भुमिका आज समाजात सर्वात मोठा घटक असलेला ओबीसी नेतृत्व गुणांमुळे मागे राहिलेला आहे. देश पातळीवर ५२ टक्के च्यावर असलेला पण झोपलेला अथवा झोपेंच सोंग घेतलेला ओबीसीचा सिंह जागा करावा असे मनात होते. ओबीसी गटा गटात व सुटसुटीत लढत होते. ओबीसी विखुरलेला आहे हे दिसतच आहे. या गटा तटांनी आपल्या ओबीसी समाजाचे कसे भले होईल. भ्रमात व लाचारीत काही ओबीसी नेते आपले कसे भले होईल या विचारात होते. ओबीसी समाज माध्यमातुन समाज कसा मोठा होईल समाज मोठा करावा ही भुमिका कोणाचीच नव्हती या मुळे काही मुठभर नेते मोठे झाले. समाज खाली खितपतच राहिला आहे. या अठरा पगड जातींना एकत्र करुन एक मोठा व्यापक ओबीसी जमा करावा व त्याचे रुपांतर जनक्रांती मध्ये करावे हा विचार मनात घोळत होता. तुकड्यात जगणाऱ्या ओबीसी नेत्यांना काही राष्ट्रीय महत्त्वाच्या नेत्यांनी आपल्या हातातील बाहुले बनवले व विविध क्षेत्राच्या माध्यामातुन वापरुन घेतले. आज आपण जागतिकीकरणाच्या वरवंट्या खाली चिडरले जात आहोत. अनेक समाज चिरडलेला गेला आहे. आपल्याती १२ बलुतेदारांची पुर्ण वाट लागली . आपले व्यवसाय आपली जमिन आपले जंगल आपले पाणी सर्व काही स्मार्ट पणे लुटण्याच्या लटपटी खटपटी चालु आहेत. आपली आर्थिक अवस्था व्यवस्थितपणे व्यवस्थेने खावुन टाकली आहे. अतिशय विचार पुर्वक आपल्याला मोडीत काढण्यात येत आहे. आपले साम्राज्य वाढविण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्या नेत्यांना व्यवस्थित वापरले आहे. म्हणुन आज पुन्हा एकदा क्रांती ची गरज आहे. म्हणुन ओबीसींच्या सर्व समाज घटकांनी एकत्रीत येवुन आपल्या आपल्या समाजाचे भले करावे. समाजाला मोठे करावे. आपण आपोआप मोठे होणार आहात. हि काळाजी गरज आहे. एकत्रित येवुन आपले गेलेले साम्राज्य परत मिळवण्यास सहकार्य करावे. हिच या ओबीसी जनक्रांती परिषदेचे मुख्य भुमिका आहे.